Ad will apear here
Next
‘खेती करो हरिनाम की, मनवा...’
कबीरपंथी भजनांच्या सादरीकरणाने शिवाजी विद्यापीठ परिसर नादमय
शिवाजी विद्यापीठात कबीरपंथी भजन सादर करताना आष्टा व दुधगाव येथील भजनी मंडळांचे कलाकार.

कोल्हापूर : 

खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। 
पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।।
मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। 
कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।।

या आणि यांसारख्या कबीराच्या दोह्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर मकर संक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी २०२०) नादमय होऊन गेला होता. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील हिरवळीवर आष्टा येथील कबीरपंथी भजनी मंडळाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे या वेळी म्हणाले, ‘कबीर आणि तुकाराम यांचा काळ वेगळा असला तरी त्यांची भाषा, वेदना आणि संवेदना एकच आहे. ते दोघेही सर्वसामान्यांची भाषा बोलतात आणि सर्वसामान्यासाठी आवाज उठवितात. त्यामुळे त्यांच्याशी आपण पटकन जोडले जातो. या दोघांचे हे वैशिष्ट्य व्यक्तिगतरीत्या मला खूप भावते. महाराष्ट्रामध्ये कबीराचे दोहे पारंपरिक पद्धतीने जपले गेले आहेत. त्यांना आज शिवाजी विद्यापीठाच्या व्यासपीठावरून सादर करताना अत्यंत आनंद होतो आहे.’ 

भारतीय लोककलेचा हा एक लुप्त होत चाललेला कलाप्रकार सादर करणाऱ्या कलावंतांना विद्यापीठात आणल्याबद्दल मराठी अधिविभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

शिवाजी विद्यापीठात कबीरपंथी भजनांच्या सादरीकरणासाठी आलेल्या आष्टा व दुधगाव येथील लोककलाकारांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत अन्य मान्यवर

या वेळी आष्टा येथील नवनाथ भजनी मंडळाचे विष्णू आबा थोरात, नारायण गाडगे, भारती मस्के, अजय गस्ती, विजय दत्तू टोमके यांनी आणि दुधगाव येथील कबीरपंथी भजनी मंडळाचे अविनाश कुदळे, भरमू भाऊ गाजी, कृष्णा आंबी, शिवाजी गवळी, मारुती गवळी, धोंडीराम सपकाळ या कलाकारांनी कबीरपंथी, तसेच वारकरी संप्रदायातील भजनांचे अत्यंत सुंदर सादरीकरण केले. 

मराठी अधिविभागातील डॉ. नंदकुमार मोरे यांनी या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी परिश्रम घेतले. या वेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. वैभव ढेरे, डॉ. पी. बी. बिलावर आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZPVCI
Similar Posts
शिवाजी विद्यापीठातर्फे परिसर छायाचित्रण स्पर्धा; ५० हजारांची पारितोषिके कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे
सरोजिनी बाबर यांच्याकडून बहुजन स्त्रीला आत्मभान देण्याचे कार्य : डॉ. राजन गवस कोल्हापूर : ‘स्वकर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वातून बहुजन स्त्रीला आत्मभान प्रदान करण्याचे कार्य डॉ. सरोजिनी बाबर यांनी केले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी सात जानेवारी २०२० रोजी कोल्हापुरात काढले. शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language